अमरावती :- सरकारी स्वस्त धान्य दुकानात काही दिवसांपासून गव्हाचा बदल्यात मक्याचे वाटप करण्यात येत होते परंतु सदर मक्का अत्यंत खराब दर्जाचा आहे असा खराब मक्का गोर गरीब नागरिकांना वितरित करण्यात येत आहे हा गरिबांवर एकप्रकारे अन्यायच आहे तसेच सध्या महाराष्ट्रावर लॉकडाउन चे सावट पसरलेले आहे ज्यामुळे नागरिकांचे व्यवसाय बुडाले आहेत कोणाचाच हाताला काम उरलेले नाही रेशनवर मिळणाऱ्याच धान्यावर सदर गरीब कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत, त्यातच या मक्क्यामुळे त्यांचा तोंडचा घास हिरावलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याच मक्याची एक पोळी आम्हाला खाऊन दाखवावी व नंतरच या मक्याचे वाटप करावे तसेच तीन दिवसात या मक्याचे वाटप बंद करून पूर्वीप्रमाणे गहू चे वाटप करण्यात यावे अन्यथा स्वाभिमान हेल्पलाईन व युवा स्वाभिमान पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जवाबदारी ही प्रशासनाची राहील या बाबत निविदन हे सादर करण्यात आले आहे निवेदन देते वेळी शहराध्यक्ष सद्दाम हुसेन(स्वाभिमान हेल्पलाईन) , आकाश राजगुरे ,रेहान , कुशाल, विक्की ,रोमान हुसेन आड सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते