*औषधी विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेबाब नाराजी :-जगन्नाथअप्पा शिंदे*

0
1032
Google search engine
Google search engine

 

रिसोड:-(रुपेश बाजड)
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोणा विषाणू ची पहिली लाट ओसरून दुसऱ्या लाटेला आपण सर्व जण सामोरे जात आहोत, कोरोनाच्या मारामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्या या यादीत कॉविड योद्धा म्हणून औषधे विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे,
लसीकरण कार्यक्रम सुरू झाला औषधी विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जिवावर उदार होऊन 24 तास सेवा देत आहेत व त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत करण्यात मोठी मदत झालेली आहे औषधी विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष संबंध हा कोरोनाबधित रुग्णा सोबत व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी जवळून येतो व त्यात त्यांचा दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,
महाराष्ट्र देशात 200 पेक्षा अधिक औषधी विक्रेते कोरोनाने बळी पडले असून 1000 च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत असे असूनही केंद्र व राज्य सरकारने कॉविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही याची खंत सर्व औषधी विक्रेते त्यांचे कर्मचारी यांच्या मनात असून ते सरकारच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत,
संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घेतली नाही सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांना वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉक डाऊन मध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे..