अकोलाःमागील काही दिवसा पासून शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अमलदारांनी वाहतूक नियोजन व दंडात्मक कारवाया सोबतच, हरविलेले परत केले ही अनोखी मोहीम सुरू केली आहे ह्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांचे घाईगर्दीने रस्त्यावरून जातांना चौकात, रस्त्यात पडलेली पाकिटे, मोबाईल, पर्स, महत्वाचे कागदपत्रे असलेल्या पिशव्या सापडल्यावर सदर वस्तूच्या मूळ मालकांचा शोध घेऊन परत करण्यात येत आहेत, फक्त वाहतूक पोलीस अमलदारच नव्हे तर अकोला शहरात मोठ्या संख्येने चालणारे ऑटो चालक सुद्धा ह्या मोहिमेत सहभागी झाले असून आता पर्यंत अनेक मोबाईल, पाकिटे, पर्स, महत्वाचे कागदपत्रे असलेल्या पिशव्या मूळ मालकांचा शोध घेऊन परत करण्यात आल्या आहेत।
असाच एक प्रसंग आज शहरातील जिल्हाधिकारी ह्यांचे निवासस्थान समोरील पोस्ट ऑफिस चौकात घडला, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष विल्हेकर हे आपले कर्त्यव्य बजावत असतांना, त्यांना चौकात एक अँड्रॉईड मोबाईल पडलेला दिसला, तो स्क्रीन लॉक असल्याने मूळ मालकाचा शोध घेण्यात अडचण येत होती तेवढ्यात अतुल विजयराव चौधरी रा हरिहर पेठ हे चौकात येऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसल्यावरून वाहतूक अंमलदार सुभाष विल्हेकर ह्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी मोबाईल हरविल्याचे सांगितले, विल्हेकर ह्यांनी मोबाईल बद्दल आणखी माहिती विचारून खात्री केली व चौधरी ह्यांना मोबाईल चे स्क्रीन लॉक उघडण्यास सांगितले असता त्यांनी उघडून दाखविले ,खात्री पटल्या नंतर सदर मोबाईल त्यांना परत केला असता त्यांनी आभार व्यक्त केले।
वाहतूक पोलीस सुभाष विल्हेकर ह्यांच्या प्रामाणिक पणा बद्दल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व सर्व वाहतूक अंमलदार ह्यांनी त्यांचे कौतुक केले आहे।