संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून अलीकडे अनेक कारणाने संत्रा उत्पादकांवर संकट कोसळत आहे. कधी गारपीट तर कधी कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अज्ञात रोगाचे थैमान, संत्रा गळती, गारपीट, कोरोना व्हायरस , तापमान वाढ , विविध नैसर्गिक संकट, आनी आता अज्ञात रोगाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबिया बहाराच्या संत्राला गळती लागल्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. एकेकाळी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील संत्रा उत्पादकांची आजची स्थिती फारच वाईट आणि दयनीय झाली आहे. आंबिया बहाराच्या संत्राला मोठ्या प्रमाणात गळती गळती लागली असून संत्रा झाडाची पाने पिवळी पडून गळत आहे सोबतच संत्राच्या झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
या भीषण संकटांचा मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना जबर फटका बसला असून कोट्यवधी रुपयांचे संत्रा नुकसान झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आंबियाच्या गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने व संशोधकांनी तात्काळ उपाय योजना सुचविण्यासाठी मोर्शी येथे तज्ञांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, विलास ठाकरे, पंकज बेले, यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रतिक्रिया ……
१) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी …
यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्राला चांगला भाव मिळून हाती पैसा येईल, या आशेवर असलेला शेतकरी वादळी अवकाळी पाऊस, गारपीट, आंबिया बहराला गळती, पानगळ यांनी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.- रूपेश वाळके, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका .
२) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आता करावे तरी काय?
दरवर्षी शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मागील वर्षी कोरोनामुळे संत्रा बेभाव विकावा लागला आणि आता संत्राला गळती लागल्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला हवा.”
प्रकाश विघे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी.
३) सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी !
यंदा चांगली फळधारणा झाली असता अचानक अज्ञात रोगामुळे संत्रा गळती सुरू झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. सततच्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी हैराण झाला असून, शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.” नरेंद्र जिचकार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका .