अमरावती : वरुड जवळील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 13 जणांची वर्धा नदी बोट उलटली. यामध्ये दुर्घटनेदिवशीच (14 सप्टेंबर) 3 मृतदेहांचा शोध लागला होता. अन्य 10 मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते. काल (15 सप्टेंबर) दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. आज (16 सप्टेंबर) पहाटेपासून पुन्हा बचाव कार्य सुरू झाले. तब्बल 45 तासानंतर आज एकूण 7 मृतदेह हाती लागले. त्यामुळे आतापर्यंत 11 पैकी एकूण 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित एकाचा शोध घेण्याचे काम NDRF आणि SDRF व डीडीआरएफ पथक करत आहे.