भरधाव कार झाडावर आदळली; चार जण जागीच ठार; मृतक अमरावती जिल्ह्यातील

0
6547
Google search engine
Google search engine

अमरावतीः परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात चौघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

परतवाडा येथील काही जण कार क्रमांक (एमएच 27 एआर ९७९६)ने परतवाड्याहून शेगावला अकोट-शेगाव मार्गाने जात होते. रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला.

 चारचाकी परतवाडा निवासी ऋषभ जयसिंगपूरे यांच्या मालकीची आहे.या अपघात चार लोकांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारचा चालक एकलासपूर निवासी अंकुश प्रल्हाद दिवटे तर इतर तीघे युवकपरतवाडा निवासी आहे घटनास्थळी तेल्हारा ठाणेदार फड ,दहिहांडा ठाणेदार सुरेन्द्र राऊत . तहसीलदार मडके . पोलिस अधिकारी देशमुख,संभाजी हिवाळे.रामेश्वर भगत,हजर असून अपघातातील मृतकाचे नातेवाईक पोहचण्यात आहे.हा अपघात मध्यंतरी रस्ता नादुरुस्त असल्याने झाल्याची माहिती आहे…..