सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे. शेतकऱ्यांच्या बाकीच्या मागण्या मान्य व्हायच्या शिल्लक असल्या तरी ह्या गोष्टीचे स्वागत केलेच पाहिजे. अर्थात आम्हाला “कर्जमाफी” हा शब्द मान्य नसला तरी शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण “कर्जमुक्ती” अपेक्षित आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य-सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा कारण यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या निर्णयाची अंमलबजावणी कशी होत आहे यावर लक्ष ठेवतील आणि जिथे जिथे अन्याय होताना दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढतील. असा इशारा ठाकरे यांनी दिला. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या, अंशत: का असेना, सरकारने मान्य केल्या त्याचे स्वागत करतो. असे ठाकरे म्हणाले.
*कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवी – श्री राज ठाकरे*
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –