बरेली (उत्तरप्रदेश) –
मुसलमान महिलांनी तीन तलाकच्या विरोधात मौलवींच्या कानफटात मारून हिंदु धर्म स्वीकारला पाहिजे. त्यामुळे तीन तलाकची समस्या कायमची सुटेल, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेच्या साध्वी प्राची यांनी केले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, तलाक देण्यासाठी क्षुल्लक कारणे पुढे केली जातात. मुलाने अंथरुणात लघवी केली, बाजारातून येतांना उशीर झाला, भाजीमध्ये मीठ अधिक झाले, अशा कारणांवरून तलाक दिला जातो.