नवी दिल्ली :
कर्णधार विराट कोहलीच्या 243 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दिल्ली कसोटीत पहिल्या डावात 7 बाद 536 धावा केल्या. भारताने 536 धावांवर आपला डाव घोषित केला. या धावसंख्येमध्ये सलामीवीर मुरली विजय 155, विराट कोहली 243 आणि रोहित शर्मा 65 यांची सर्वात मोठी भागीदारी आहे. विराटने आणखी एक द्विशतक ठोकत अनेक विक्रम नावावर केले आहेत.