चांदुर बाजार / बादल डकरे-
शेतकरी याना योग्य भाव मिळावा या करिता सरकार तर्फे नाफेड केंद्र सुरू करण्यात आली होती.मात्र तुरीचा साठा पूर्ण झाल्याने आणि वारंवार नाफेड या फायदा हे व्यापारी घेत आल्याने नाफेड केंद्र बंद करण्यात आले होते.मात्र जो पर्यत शेतकरी यांच्या घरातील एक एक दाना तुरीचे खरेदी सरकार करणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नसल्याचे आमदार बच्चू कडू यांनी आयुक्त आणि मुख्यमंत्री याना निवेदन देऊन तुरी संबंधी डेरा आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते.त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी चांदुर बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपली तूर आणावी असे आव्हान प्रहार शेतकरी संघटना अमरावती अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी केली होती.
*या डेरा आंदोलनाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती.सुमारे 60ते 70 ट्रॅक्टर या ठिकाणी वेगवेळ्या तालुक्यातून शेतकरी आपली तूर घेऊन आली होते.या सर्व ट्रॅक्टर यांची रांग हि कृषी उत्पन्न बाजार समिती च्या बाहेर लागली होती.अंदाजे त्या ट्रॅक्टर मध्ये 1000 किंटल तूर होती.सुरुवातीला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रहार कार्यकर्ते यांची नायब तहसीलदार विजय गोहड यांची चर्चा झाली.त्यानंतर मोजणी आणि टोकन मिळत असेल तर तूर आत नेली जाईल यावर प्रहार कार्यकर्ते ठाम होते.वरीस्ट अधिकारी यांच्या बोलणे झाल्यावर ताहसिलदार यांच्या उपस्थिती मध्ये तुरीच्या मोजणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुरुवात झाली.आणि प्रहरचे आंदोलन यशस्वी झाले.यावेळी या आंदोलन मध्ये प्रहार शेतकारी संघटना मंगेश देशमुख,दीपक भोगाडे,बबलू पावडे,विनोद जवंजाळ,नितीन कोरडे,मनोज देशमुख,मुन्ना बोंडे, शिशिर ठाकरे,मुज्जफर हुसेन,तसेच मोठ्या प्रमाणात प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते*
सुरुवातीला तूर मोजणी रवींद्र बागळे रा वणी बेळखेडा या शेतकरी यांची तहसिलदार तसेच प्रहार कार्यकर्ते यांच्या समोर करण्यात आ