हिरापूर येथे युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
685
Google search engine
Google search engine

महेश कोडापे / शंकरपूर :

येथून 2 किमी अंतरावर नसलेल्या हिरापूर येथील युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 14 डिसेंबर रोजी उघडकीस आली. मोहन रमेश जाधव (28) असे मृतक युवकाचे नाव आहे.
मृतक मोहन हा बऱ्याच दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे राहत होता. 11 डिसेंबर रोजी तो स्वगावी हिरापूर येथे आला होता. मात्र 12 डिसेंबर पासून तो अचानक बेपत्ता झाला. आज अचानक त्याचे प्रेत विहिरीत तरंगताना आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. सोनकुसरे, पठाण, चाफले, नंदूरकर करीत आहेत.

फोटो – प्रतिकात्मक