मुंबई – रामराज्यात सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?, असे आक्षेपार्ह वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण यांनी विधान परिषदेत केले. २८ फेब्रुवारी या दिवशी लक्षवेधी प्रश्नांवरील चर्चेच्या वेळी जातपंचायतीच्या अंतर्गत समाजात चालू असलेल्या कुप्रथा रोखण्यासाठी शासन कोणती कार्यवाही करणार, या गंभीर प्रश्नावर चर्चा चालू असतांना कौमार्य चाचणीच्या कुप्रथेविषयी बोलतांना आमदार सौ. विद्या चव्हाण यांनी वरील आक्षेपार्ह वक्तव्य केले.
Home ताज्या घडामोडी (म्हणे) ‘सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?’ – आमदार विद्या...