सत्यमेव जयते वॉटर कपचे तुफान आता परळी वैजनाथ मध्ये

0
848
Google search engine
Google search engine

सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेने परळी तालुक्यात तुफान आनले .

परळी तालुक्यातील 60 गावे होणार पाणीदार.

80महिला व219जलनायकांची टिम प्रशिक्षण घेवुन सज्ज.

परळी: नितीन ढाकणे, दिपक गित्ते

सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील पाच तालुक्याची निवड झाली असुन परळी तालुक्यातील 84गावापैकी60 गावानीं यात भाग घेवुन स्पर्धे अगोदरचे प्रशिक्षण घेवुन गाव पाणीदार करणेसाठी 299जलनायकांची फौज सज्ज झाली असुन या टिम मध्ये 80महिला असुन पुरूषांची संख्या  219 आहे.

 

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन हे आपल्या परिने अनेक कामे करीत असुन सामाजिक भावनेतुन दुष्काळाला हरविण्यासाठी व अशी गावे पाणीदार करण्यासाठी सिने अभिनेते अमिरखान व त्यांचे मित्र किरणराव यांनी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वतीने वाँटर कप स्पर्धेची कल्पना नुसती मांडली नसुन गेल्या वर्षी अमलात आनुन यशस्वी करून  दाखवली.त्यावेळी अनेक गावांनी यात सहभाग घेवुन गावे पाणीदार केली अनेक गावांनी बक्षिसेही पटकावली.

या वर्षीसुध्दा वाँटर कप स्पर्धा ठेवण्यात आल्या असुन या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन जिल्ह्यातील पाच तालुके निवडण्यात आले आहे.यात परळी तालुक्याचा समावेश असुन तालुक्यातील 84गावापैकी 60गावांनी या स्पर्धेत भाग घेतला असुन स्पर्धेपुर्वीचे देण्यात येणारे प्रशिक्षण लातुर जिल्ह्यातील तालुका औसातील गेल्या वर्षी वाँटर कप स्पर्धेत तालुका पातळीवरचे प्रथम दहा लाखाचे तर मुख्यमंत्रीचे आठ लाखाचे बक्षिस मिळवलेल्या दावतपुर या गावात जावुन घेवुन आपली गावे पाणीदार करण्यासाठी 299 जलनायकांची फौज सज्ज असुन या टिम मध्ये 80महिलांनी हिरीरीने भाग घेतला आहे. वाँटर कप स्पर्धेची सुरूवात 8एप्रिल पासुन सुरू होणार असुन  तालुक्यातील 60 गावातील प्रशिक्षीत जलनायक व गावकरी स्पर्धेची कोणकोणती कामे करायची आहेत या साठी दररोज शिवार फेरी काढुन कामाची आखणी करण्यात दंग आहेत हि स्पर्धा यशस्वी करणेसाठी परळीचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,क्रषी विभागाचे अधिकारी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व  पाणी फाऊडेशनचे संतोष शिनगारे,प्रशांत ईखे रमेश शेप हे जातीने मेहनत घेत आहे.

               (चौकट)
स्पर्धे पूर्वी करता येणारी कामे .
1) शोषखड्डे – 5 गुण
2) रोपवाटिका /नर्सरी  -5 गुण
3) माती परीक्षण -5 गुण
4) आगपेटीमुक्त शिवार (कम्पोस्ट खड्डे किंवा ढीग – बयोडायनामीक खड्डे – नाडेप )- 5 गुण
5) पाणी बचत तंत्रद्न्यान (ठिबकसिंचन -स्प्रिंकलर -मल्चिंग -बी बी एफ -बायोमास वापरून केलेले मल्चिंग ) – 5 गुण
6) अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण पाहणी करून रिपोर्ट तयार करणे  – 3 गुण
असे एकूण – 28 गुण स्पर्धे पूर्वी मिळवू शकतो …

श्रमदान 20
यंत्रकाम 20
कोणत्याही अस्तित्वात असलेल्या 2  जुन्या रचनांची दुरुस्ती – 7 
अथवा 
विहीर पुनर्भरण 
अथवा 
नाविन्यपूर्ण उपक्रम
शेवटच्या मुद्द्याला हे 2 मुद्दे   *or* आहेत.
25  गुणासाठी काहीही करायचे नाही
या मध्ये संपूर्ण स्पर्धेची कामे गुणवत्तापूर्ण असली पाहिजे.

गुणवत्ता  – 10 गुण
माथा ते पायथा – 10गुण
वॉटर बजेट – 5 गुण.
( विशेष चौकट)

                                     सन्मानपत्र सह भरगच्च बक्षिसे
वाँटर कप स्पर्धे मध्ये उत्क्रष्ट काम करणाय्रा गावांना राज्य पातळीवरचे प्रथम बक्षिस 75 लाख रूपये ठेवले असुन दुसरे 50 लाखरू. तिसरे 40 लाख रू. तर तालुका पातळीवर सर्वोत्तम काम करणाय्रा गावांला 10 लाखाचे बक्षिस व सन्मान पत्र देवुन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगीरी करणाय्रा गावाकरिता हि स्पर्धा असुन गावे पाणीदार होवुन टँकरमुक्त व्हावी हा सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेचा उद्देश असुन हि कामे शासनाची यत्रंणा, सेवा भावी संस्था व लोकसहभागातुन होणार असुन परळी तालुक्यातील 60 गावांतील 299 जलनायक व गावकरी आपल्या गावांत कोणकोणती कामे करावयाची याच्या नियोजनात व्यस्त झालेली दिसत आहे.