पळसखेड :- पळसखेड येथील भवानी देवी संथान तर्फे श्री क्षेत्र वृंदावन येथे आयोजित भागवत सप्ताह साठी 150 भाविक रवाना झाले.
भवानी देवी संस्थान कडून दरवर्षी वेगवेगळ्या धाम वर भागवत कथेचे आयोजन केल्या जाते. यापूर्वी, द्वारका धाम, जगनाथपुरी,रामेश्वर,येथे करण्यात आले यावर्षी अधिक मासाचे औचित्य साधून श्री क्षेत्र वृंदावन येथे वाणीभूषण हा.भ.प.कुंजविहारी महाराज यांच्या वाणीतून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी पळसखेड व परिसरातील 150 भाविक वृन्दावन येथे रवाना झाले आहे. त्या ठिकाणी नास्ता, जेवण, व राहण्याची सर्व व्यवस्था भवानी देवि संस्थानचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी केली आहे.