उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील ४४ वर्षाचा शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना कोंड येथील शिवारात ता ८/११/२०१८ रोजी घडली शिवाजी राघु घुटे वय ४४ वर्षे असे शेतकर्याचे नाव आहे सदर घटनेची माहिती मयताचे नातेवाईक विजयकुमार श्रावण घुटे यांनी ढोकि पोलिस ठाण्यात दिली असून त्यांनी सांगीतलेल्या माहितीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात म्रत्यूची नोंद करण्यात आली आहे मयताचे शवविछेदन कोंड येथील प्राथमिक आरोग्य केँद्र येथे डाँ लोमटे किशन व डाँ सुरज फोलाने यांनी सकाळी आठ वाजता शवविछेदन केले पोलिस ठाण्याच्या तक्रारीत म्रत्युचे कारण विष पिऊन आत्महत्या असे दिलेले आसून पोलिस ठाण्याच्या माहितीमध्ये नमुद करण्यात आले आहे सदर घटनास्थळाचा ढोकि पोलिसांनी पंचनामा केला आहे पुढील तपास ढोकि पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.मयतावर कोंड येथे अंत्यवीधीत करण्यात आले