वास्तवात जे घडले ते न मांडता मालकाला जे अपेक्षित आहे, ते वृत्तपत्रात मांडले जाते, ही सध्याच्या पत्रकारितेची दु:स्थिती आहे. महाभारताच्या वेळी धृतराष्ट्राचे पुत्र मारले जात असतांनाही संजयाने जे घडले, त्याचे सत्य वृत्त धृतराष्ट्राला दिले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पत्रकारांनी संजयाप्रमाणे सत्यनिष्ठ रहायला हवे. असे केले तरच सत्ता आणि समाज जागृत होईल. पत्रकारांनी वैचारिक स्तरावरील क्षत्रिय बनून हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी विचारांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मांडले.