भाग्यनगर – भारतात अवैधपणे रहाणार्या रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या निर्णयावरील स्थगितीच्या विरोधात भाग्यनगरमधील गोशामहाल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
राजासिंह ठाकूर म्हणाले की, ४० सहस्रांहून अधिक रोहिंग्या मुसलमानांनी विविध मार्गांनी विशेषत: भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात अवैधरित्या प्रवेश केला आहे. येथे येताच ते ‘सुरक्षित’ स्थळी गेले. हे घुसखोर देशासाठी धोका ठरू शकतात. रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी सर्व लोकांनी एकजूट दाखवावी.
न्यायालयात श्री. ठाकूर यांना देहलीतील अधिवक्त्यांनी साहाय्य केले.