मुंबई :-
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. दवे यांच्या निधनाने आपणास मोठा धक्का बसला. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या निमित्ताने मी त्यांच्या सातत्याने संपर्कात होतो. त्यांनीही जातीने लक्ष घालून या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मंजुरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली होती. विशेषत: मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाचे ठरू शकणाऱ्या प्रस्तावित सागरी किनारा मार्ग आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना त्यांनी तात्काळ पर्यावरणविषयक मंजुऱ्या दिल्या होत्या. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक असलेल्या श्री. दवे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे, विनम्र आणि संवेदनशील होते.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. दवे यांच्या निधनाने आपणास मोठा धक्का बसला. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या निमित्ताने मी त्यांच्या सातत्याने संपर्कात होतो. त्यांनीही जातीने लक्ष घालून या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मंजुरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली होती. विशेषत: मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाचे ठरू शकणाऱ्या प्रस्तावित सागरी किनारा मार्ग आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना त्यांनी तात्काळ पर्यावरणविषयक मंजुऱ्या दिल्या होत्या. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक असलेल्या श्री. दवे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे, विनम्र आणि संवेदनशील होते.