येरमनार मध्ये जीर्ण झालेले विद्युत खांब  बदलले – सरपंच बालाजी गावंडे  यांच्या प्रयत्नांना यश..

0
527
Google search engine
Google search engine

अहेरी तालुक्यातील येरमनार गावातले जूने लोखंडी विद्युत खांब जीर्ण झालेले होते. आणि ते जीर्ण विद्युत खंबे हवा – वारा येऊन पडल्यास कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची 100% शक्यता होती.
त्यामुळे येरमनार ग्रा.पं. चे सरपंच मा. बालाजी गावडे आणि ग्रा.पं.तिल पदाधिकाऱ्यांनी त्वरित विद्युत वितरण कंपनी भामरागड येथे दिनांक 27/09/2017 ला जावून उपविभागीय अधिकारी मा. श्री पाटील यांना लेखी तक्रार देऊन येरमनार येथील जीर्ण झालेले विद्युत खंबे त्वरित बदलवून देण्याबाबत चर्चा केली . त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी यांनी जीर्ण झालेले विद्युत खंबे 15 दिवसात बदलून देतो असे आश्वासन ग्रा.पं. येरमनार चे सरपंच मा. बालाजी गावडे यांना दिले.
त्यानंतर मा. उपविभागीय अधिकारी यांनी या गंभीर मुद्यावर विचार करुण 15 दिवसाचा आधीच येरमनार येथील जीर्ण झालेले विद्युत खंबे बदलविन्याचा कामाला सुरुवात केली
त्यामुळे येरमनार गावातील नागरिकांनी सरपंच बालाजी गावडे आणि विद्युत विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत