नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक चांगल्या गोष्टींचा आक्रमकतेने पुरस्कार करत आहेत; मात्र त्यांनी आतापर्यंत हिंदूंसाठी काहीच केले नाही. हिंदू अजूनही वंचितावस्थेतच जीवन जगत आहेत, असे मत मूळ जर्मन असलेल्या आणि ख्रिस्ती धर्मातून हिंदु धर्माचा स्वीकार केलेल्या प्रसिद्ध लेखिका मारिया वर्थ यांनी व्यक्त केले. मारिया वर्थ यांना त्यांच्या एका जर्मन मित्राने कळवले होते की, जर्मनीतील प्रसारमाध्यमे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू राष्ट्रवादाचा आक्रमकतेने पुरस्कार करत आहेत’ असा प्रसार करत आहेत. त्यावर उत्तर देतांना श्रीमती मारिया वर्थ यांनी वरील मत व्यक्त केले. यावर मारिया वर्थ यांच्या त्या जर्मन मित्राने आश्चर्य व्यक्त केले.