धक्कादायक – पाच बोकडाची पार्टी केली आन् वाडप्यालाच कोरोना झाला !

0
7766
Google search engine
Google search engine

कळंब तालुक्यात चर्चा ; पाच बोकडाची पार्टी केली आन् वाडप्यालाच कोरोना झाला !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका गावात पाच बोकडाची मोठी पार्टी केली होती त्या पार्टीतील ( वाडप्या म्हणजे मटण वाढणारा ) तोच कोरोना पाँझीटिव्ह निघाल्यामुळे मटण खाणार्यांच्या काळजाचा ठोकाच वाढू लागला आहे .अशी सध्या चर्चा सुरु आहे.
याबाबत अधीक होत असलेली चर्चा अशी आहे की , दोन दिवसापूर्वी कळंब शहराच्या जवळच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात पाच बोकडाच्या पार्टिची शाही मेजवाणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे आयोजकांनी त्यांच्या मर्जीतील कळंब शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण दिले होते.
लाँकडाऊन असल्यामुळे बर्यापैकी व्यापार्यांनीही मटणावर ताव मारला असल्याची चर्चाही शहरात रंगू लागली आहे.तसेच जेवढ्या लोकांनी या पार्टित हजेरी लावली होती तेवढ्या लोकांचा आता प्रशासन शोध कसा घेणार ? असा सवाल कळंबकरांना उपस्थीत होत आहे.प्रशासन सुतावरुन स्वर्ग गाठतं आणि हाकेच्या अंतरावर झालेल्या पार्टिचा सुगावाही लागत नाही म्हणजे नेमक काय गौडबंगाल आहे अशीही कुजबूज सुरु झाली आहे.सध्या कोरोनाने आख्खे जग हैराण आहे आणि हे सर्व नियम धाब्यावर बसवून सुंदर मेजवाणी पार पडली असही बोलल जात आहे.सध्या कळंब शहर दोन दिवस संपूर्ण बंद करण्यात आहे पण शहरात या बोकडाच्या पार्टीची चर्चा मात्र लतीच सुरु आहे. नेमका काय प्रकार घडला हे आजुनही प्रशासनाला समजू शकले नाही.




प्रशासनही हतबल

याबाबत संबंधीत कोरोना प्रतिबंधीत एका वरीष्ठ अधीकार्याशी फोनवरुन माहीती विचारली असता या पाच बोकडाच्या पार्टिबाबत अधीक्रत कोणी माहीती दिली नाही पण जर अशी पार्टी झाली असेल तर जे त्या पार्टीला हजर होते त्यांनी स्वाता होऊन पुढे येऊन स्वताची तपासणी करुन घ्यावी असे एका अधीकार्याने आवाहन केले आहे.तो व्यक्ती रुग्ण असल्यामुळे त्या रुग्णाला आम्ही जबरदस्ती करुन विचारु शकत नाहीत.आम्ही विचारले परंतू काही सांगीतले नाही अस अधीकारी यांनी सांगितले.