बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत  लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार – पंकजाताई मुंडे

0
576
Google search engine
Google search engine

बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत  लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार – पंकजाताई मुंडे

कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

बीड । दिनांक १९
बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले.  कर्ज बुडव्यांना बाजूला ठेऊन बॅक  नफ्यात आणली, कारभार सुरळीत केला. सुरवातीला लोकांना देण्यासाठी एक रूपया देखील नव्हता, परंतू चांगला कारभार करत लोकांना बोलावून त्यांच्या ठेवी परत दिल्या असे त्या म्हणाल्या.

सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा अवमान

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर झाला. सेवा सोसायटीचे उमेदवार बाद केले. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय केला गेला. जो नियम परभणीच्या बाबतीत तो आम्हाला का नाही ? असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणून अजब-गजब पध्दतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न झाला.  या निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून सुरळीत चालू असलेल्या संस्थेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप पंकजाताई मुंडे यांनी केला.

कोरमच पूर्ण होत नाही मग निवडणूक कशाला ?

निवडणूकीची ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी आहे. केवळ आठ जागेसाठी निवडणूक होत असल्याने तेरा जागेचा कोरम पूर्ण होत नाही, मग निवडणूकच कशाला ? असं त्या म्हणाल्या. येनकेन प्रकारे प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानाचा आम्ही  निषेध करतो. उद्याच्या मतदानावर आमचा बहिष्कार आहे असे सांगत सर्व जागांची निवडणूक घ्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेस माजी आमदार भीमसेन धोंडे, सुभाषचंद्र सारडा, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, अशोक लोढा आदी उपस्थित होते.