*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*
कळंब:-उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
महविकास आघाडीच्या वतीने बंद पाठिंबा देण्यात आला असून कळंब शहरासह तालुक्यात सुद्धा उत्तम प्रतिसाद पहायला मिळाला. सकाळी काही काही दुकाने सुरू होती मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली.
यावेळी महविकास आघाडीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.त्यानंतर व्यापाऱ्यांनी या बंदला उत्तम प्रतिसाद दिलेला पाहायला मिळला.
एरवी गजबजलेला परिसर म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज चौक,होळकर चौक,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,सराफ लाइन,मेन रोड परिसर आदी भागांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला
कळंब शहरात पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कळंब शहरात व तालुक्यात महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. सुरक्षेसाठी पोलिसांकडुन शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.