सर्वोच्च न्यायालयानं दिलेला विरोधातील निकाल, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
गुरुवारी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यापूर्वीच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तसंच महाविकास आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यानंतर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.