बालाजी आंधळे यांना मातृशोक जनाबाई आंधळे यांचे निधन

0
825
Google search engine
Google search engine

परळी (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जनाबाई आंधळे यांचे राहत्या घरी दि.07 आँगस्ट रोजी दुपारी 1 वा. निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्ष वयाच्या होत्या.

जनाबाई आंधळे यांचे मंगळवारी दि.07आँगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मावळली. कै.जनाबाई आंधळे हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्या सर्वपरिचीत होत्या.कै.जनाबाई आंधळे यांच्या पार्थिवावर मुळ गावी हेळंब येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. बालाजी भाऊराव आंधळे यांच्या मातोश्री होत. यावेळी
सर्व स्तरातील प्रतिष्ठीत, नागरिक, राजकीय, व्यापारी, साधुसंत, पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस कर्मचारी,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व आप्तस्वकीय मोठया प्रमाणात उपस्थित होते. आंधळे कुटूंबियांवर कोसळलेल्या दु:खात दै……….परिवार सहभागी आहे.

राख सावडण्याचा कार्यक्रम
राख सावडण्याचा विधी गुरूवार, दि.09 रोजी सकाळी 7 वा. होणार आहे.