अकोला:- अकोला शहरात काल दि. ३१ ऑक्टोबरला क्रीडा व युवक संचालनालय भारत सरकार द्वारा संचालित “नेहरु युवा केंद्र” द्वारा आयोजित अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम येथे होते, या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील तालुका स्तरावर निवड झालेल्या उमेदवारांची स्पर्धा आधी घेण्यात आली. त्या स्पर्धे मध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर पाठवण्यात आले. तेथे आपल्या वक्तृत्वाची छाप पाडणाऱ्या उमेदवाराला राज्याच्या व्यासपीठावर आपला आवाज देण्याची व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून “युवा वक्ते अक्षय राऊत” विद्यार्थी प्रतिनिधी श्री शिवाजी महाविद्यालय अकोला यांची अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र राज्याच्या व्यासपीठावर दमदारपणे नाव कोरण्याकरीता निवड करण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिर्माण हा विषय प्रखर पणे मांडायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या व्यासपीठावरून अकोला जिल्ह्याचा नावलौकिक व ठसा उमटविण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधीचे सर्वत्र कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.