दिवाळी सुटी संपली… बच्चे कंपनीचा मामाच्या गावाचा निरोप – बच्चे कंपनी लागले परतीला <><> राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशनमध्ये गर्दी

0
483
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)

दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली. दिवाळी फराळ भरपूर खाल्ला. मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं. नवीन मित्र मिळाले. पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नसलं तरी सुटीतला शेवटचा रविवार असल्याने ते परतले आहे.
शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुटी उशिराच सुरू झाली. काही शाळांना शुक्रवार, दि. १३ पासून सुट्या लागल्या. त्यामुळे दोन दिवसांत ही मुलं दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेले होते. तसेच पुणे, मुंबई, नागपुर किंवा राज्याच्या विविध भागातून भाचे कंपनी मामाच्या गावासाठी चांदुर रेल्वेत आली होती.
जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवार, दि. ०६ नोव्हेंबर रोजी सुरू होत असल्या तरी इंग्रजी माध्यमांच्या प्रत्येक शाळा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. काही शाळा सोमवार, दि. ३० पासून सुरू झाल्या आहेत. तर काही शाळा १ तारखेपासून सुरू होत आहेत. परंतु शेवटचा रविवार असल्याने या सुटीत सोडण्याची जबाबदारी मोठ्यांनी घेतली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या शहरातील बसस्थानकात तसेच रेल्वे स्टेशनवर रविवारी, सोमवारी सकाळपासूनच गर्दी झालेली पाहायला मिळाली.