चंद्रपूर :- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वे स्टेशनजवळीस खरकाडा जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अस्वलाने केलेल्या हल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मृतामध्ये बिसन कुळमेथे (५५), फारुख शेख(३२) आणि रंजना राऊत(३५) यांचा समावेश आहे.अस्वलाने वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला यामध्ये 1 ग्रामस्थ गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.सदर घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Home ताज्या घडामोडी चंद्रपुर जिल्हयात अस्वलाच्या हल्यात तीन जणांचा मृत्यु, एक जण जखमी, तेंदुपत्ता तोडायला...