रेवाडी (हरियाणा) –
देशातील ९९ टक्के राजकीय नेते पाखंडी आहेत. मी राजकारणात नव्हतो. आताही नाही आणि पुढेही नसणार. केवळ मधेमधे राजकारण्यांना सुधारण्यासाठी काठी हातात घेईन, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. किशनग-घासेड़ा गावामधील गुरुकुलाकडून आयोजित गुरुकुल महोत्सवामध्ये ते बोलत होते. योगऋषी रामदेवबाबा हे या गुरुकुलाचे अध्यक्ष आहेत.