मुख्यमंत्र्यांकडून “दिलगिरी” पण नाभिक समाज आंदोलनावर ठाम !

0
800
Google search engine
Google search engine

मुंबई :-

पाटस येथिल कार्यक्रमातील भाषणावेळी दिलेल्या उदाहरणातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, तरीही या विधानामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो अशी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र सुधीर उर्फ बंडू राऊत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा नाभिक महामंडळाचा कसलाही संबंध नसल्याने मुख्यमंत्र्यांनी माध्यमातून जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली आहे