अमरावती जिल्ह्यातील ५ मध्यम व १९ लघु प्रकल्प कार्यान्विकरण समारंभ मुख्यमंत्र्यांचा हस्ते संपन्न

0
906
Google search engine
Google search engine

वरुड :- सोलर प्रोजेक्ट उद्घाटन व केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ५ मध्यम व १९ लघु प्रकल्प कार्यान्विकरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी आणि राज्याचे ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रक्ल्पातून निर्माण होणारी वीज तालुक्यातील टेंभूरखेडा, बेनोडा,लोणी, शेंदूरजनाघाट, पुसला, वरुड येथील ३३ केव्ही.उपकेंद्र आणि पुसला मिल्स, तिवसा येथील ११ केव्ही वीज उपकेंद्रांना पुरविण्यात येणार आहे, या उपकेद्रांतून शेतीसाठी वीज पुरावाठा होत असलेल्या १८८९६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.गव्हाणकुंड येथिल २० मेगाव्हाट सौर कृषी वाहिनी मधील वीज निष्कासन व्यवस्था व पायाभूत सुविधा उभारण्याची कार्यवाही महावितरण व महानिर्मिती तर्फे करण्यात येणार आहे. गव्हाणकुंड येथिल शेकदरी धरण परिसरातील वनजमिनीवर निर्माण होत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पामुळे परसारातील शेतकरी सुखावला आहे. भारणीयमनामुळे शेती धोक्यात आली असतांना पिकांसह संत्रा बागा जगवायच्या कशा हा मोठा प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला होता.दिवसा भारनियमन राहत असल्याने रात्री बेरात्री जीव धोक्यात घालुन ओलितासाठी शेतात जावे लागत होते.अशावेळी शेतका-यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प गव्हाणकुंड यथे होत आहे

यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रविनजी पोटे पाटील, अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खा.मा. आनंदरावजी अडसूळ साहेब,खा.रामदास तडस,आ.डॉ.अनिल बोंडे,प्रशासकीय अधिकारी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.