शहरातील बंद पथदिव्यांबाबत नगरसेवक मोटवानी आक्रमक – दुरूस्तीकरीता मुख्याधिकाऱ्यांना ३ दिवसांचा अल्टीमेटम

0
699
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
   चांदूर रेल्वे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक पथदिवे गेल्या १ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. या बंद पथदिव्यांवरून विरोधी पक्ष गटनेता तथा नगरसेवक संजय मोटवानी आक्रमक झाले असुन या पथदिव्यांच्या दुरूस्तीकरीता मुख्याधिकारी यांना ३ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
   चांदूर रेल्वे शहराचे सौदर्यींकरण व्हावे या दृष्टीने विशेष निधीतुन रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकपर्यंत दुभाजकावर दोन बाजुने जवळपास १०५ पथदिवे ४ ते ५ वर्षांपुर्वी बसविण्यात आले. यामुळे शहराची शोभा वाढली असुन शहर चांगलेच प्रकाश झोतात राहत होते. याच मुख्य रस्त्यावरून नागरीकांची जास्त वर्दळ सुरू असते. गेल्या १ वर्षापासुन यामधील अर्ध्यापेक्षा जास्त पथदिवे बंद असुन केवळ शोभेची वास्तु बनले आहे.
या बंद पथदिव्यांवरून शुक्रवारी नगरसेवक संजय मोटवानी आक्रमक झाले. बंद पथदिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी निवेदनातुन केली आहे. येत्या तीन दिवसांत पथदिव्यांचे काम सुरू न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा सुध्दा मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. काही दिवसांपुर्वी मुख्याधिकारी यांच्यावर शहरातील पाण्याच्या समस्येबाबत बेजबाबदारपणाचा आरोप संजय मोटवानी यांनी केला होता. मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे दिवसेंदिवस शहरातील समस्या वाढत चालल्या आहे. गेल्या एका वर्षापासुन पथदिवे बंद असतांनाही प्रशासनाचे व इतरांचे यावर लक्ष नसणे हे शहराचे दुर्दैवच आहे असेही संजय मोटवानी यांनी म्हटले.