चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
तालुक्यातील चिरोडी येथील एका शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वेवरून १० कि.मी. अंतरावर असलेल्या चिरोडी येथील अर्जुन हंजारी चव्हाण (४०) हे शुक्रवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान शेतातुन घरी आले असता चक्कर येऊन पडले. तत्काळ त्यांना चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अर्जुन चव्हाण यांना ऊन लागल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सकाळपासुनच सुर्य आग ओकत असतांना आता सकाळीसुध्दा घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अशातच सदर शेतमजुर उष्माघाताचा तालुक्यातील प्रथम बळी ठरला असल्याचे समजते.