सातारा : लग्नानंतर हनीमूनला गेलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे . यात आता सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
श्री आनंद कांबळे आणि पत्नी दिक्षा कांबळे हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले. मधात पसरनी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पतीवर कोयत्याने वार केले, ज्यात आनंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.