उस्मानाबादेत राष्ट्रवादीला मनसेचा जाहिर पाठिंबा

0
1028
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५,०००हजार शेतकर्यांना पिक विमा रक्कम मिळावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंदोलनाला व पाठपुराव्याला महाराष्ट्र नवनिर्मान सेना उस्मानाबाद जिल्हा जाहिर पाठींबा देत आहोत व जो पर्यंत उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकर्यांना पिक विमा रक्कम रक्कम मिळत नाही तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीर पणे महाराष्ट्र नवनिर्मान सेना उभी राहिल असे आश्वासन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिले आहेउस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५,०००हजार शेतकर्यांवर अन्याय होत आसुन लवकरात लवकर सोयाबीन पिकाचा विमा मिळावा यासाठी आज दिनांक १७-९-२०१८रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने पालकमंत्री मा.अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले या वेळी पालकमंञी अर्जुन खोतकर यांनी दिनांक २६-९-२०१८रोजी मंञालयात या विषयावर बैठकीचे निवेजन केले आसुन महसुल मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकर्यावर अन्याय होणार नाही त्यांना सरकारच्या तिजोरीतल ७०,कोटी दिले जातील आसे पालकमंत्री यांनी आश्वासन दिले आले या वेळी आमदार राणाजगजिंतसिह पाटीलसाहेब, मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे,एस.टी.महामंडळाचे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अमोलभैय्या पाटोदेकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राजसिंन्हा राजेनिंबाळकर,मनसेचे बबनराव वाघमारे,सौरभ देशमुख,संजय पवार आदी राष्ट्रवादीचे व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते