भाऊ कदम यांनी मागितली आगरी समाजाची माफी – आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याच प्रकरण

0
883
Google search engine
Google search engine

भाऊ कदम यांनी आगरी समाजाची माफी मागितली आहे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. याबाबत भाऊ कदम यांनी आगरी समाजाची माफी मागितली आहे. जयेंद्र खुणे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात राजाराम पाटील, जयेश वाकडीकर, राज पाटील, विजय उलवेकर यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.