घटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

0
937
Google search engine
Google search engine

प्रयागराज (कुंभनगरी)

आम्ही हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हे आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय कामधेनु आयोग’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे; मात्र हा आयोग गोपालन करणार्‍या व्यक्तीला लाभदायक आहे. यामध्ये संपूर्ण गोवंशाच्या हत्येला बंदी घातलेली नाही. गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून सरकारने घोषित करावे. देशात हिंदू बहुसंख्य असल्याने घटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यास काहीच अडचण नाही. धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली, त्याप्रमाणे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे. चारही पीठांचे शंकराचार्य आणि १३ आखाडे यांतील संत आणि महंत यांचीही हीच मागणी आहे. देशात शाळांमध्ये बायबल आणि कुराण शिकवले जाते, तर गीताही शिकवली पाहिजे. गीता का शिकवली जात नाही ? केरळ सरकार तेथे शाळेत श्री सरस्वतीदेवीचे पूजन करू देत नाही. हिंदूंविषयी असा भेदभाव का केला जातो ?