आकोटःप्रतिनिधी –
वानधरणावरुन येणाऱ्या सामुहीक गुरुत्ववाहीनीवर अचानक लागलेल्या मोठ्या गळतीमुळं अकोट उपविभागाचा पाणीपुरवठा दि.23 जुले ते 24 जुलै दरम्यान बंद राहणार आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांनी दिलेल्या माहीतीनुसार गळती दुरुस्ती कामासाठी अकोट शहरासह,तेल्हारा शहर,हीवरखेड झोन ,अडगाव झोन,व आकोट ८४ खेडी प्रादेशिकचा पाणी पुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद राहणार आहे.ऐन पावसाळ्यात वरुणराजा रुसलेला असतांना अचानक दुरुस्तीसाठी बंद होणाऱ्या पाणीपुरवठाने नागरीकांची कसोटी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.