अकोट ता.प्रतिनिधी-
सांगली कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे.याच कडीत राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचही नाव जोडल्या गेले आहे.सांगली कोल्हापुरच्या पूरग्रस्तांना मदत म्हणुन त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार .रुपये जमा करत माणुसकीचा धर्म मोठा हे वचन सार्थकी ठरवले आहे.
शाळकरी मुलं सरकारी नोकरदार, व्यापारी उद्योजक ते देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही विविध मित्रपरिवार,सामाजिक संघटना एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत या कडीत समाजप्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराज यांनीही आपले दाईत्व पार पाडुन समाजास पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन केले आहे.
सत्यपाल महाराज हे आपल्या सप्तखंजेरी च्या माध्यमातून गेल्या ५३ वर्षांपासून अखंड भारतभर समाज प्रबोधन करत आहेत.