विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकासाबरोबर सामाजिक व भावनिक विकास महत्त्वाचा। …डाँ.संजय पोरे

0
489
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव:न्युज

विद्यार्थाचा केवळ बौद्धिक विकासच पुरेसा नाही पदवी बरोबर सामाजिक व भावनिक विकास होणे ही महत्त्वाचे आहे असे मत डाँ संजय पोरे यांनी व्यक्त केले . भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे शिवाजी विद्यापीठाचा महाविद्यालय आयोजित पदवीदान समारंभ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते डॉ मंदा घाटगे, डॉ उत्तम मोहिते, डॉ गजानन माळी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यायाच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा कुलकर्णी होत्या. प्रा. डॉ सौ. मंदा घाटगे आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जबाबदारीची जाणीव होते आणि तो भविष्यातील विविध आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनतो. प्रा. डॉ उत्तम मोहिते म्हणाले की आधुनिक काळामध्ये शिक्षणाला अतिशय महत्व आहे. आणि शिक्षण प्रक्रियेमधील पदवी संपादन करणे हा एक महत्वाचा टप्पा असतो. त्यानंतर प्रा. डॉ गजानन माळी यांनी मार्गदर्शन करून पदवीप्राप्त विध्यार्थिनीचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यायाच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा कुलकर्णी म्हणाल्या की, पदवीप्राप्त करणे हा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील परमोच्च क्षण आहे. समाज मनामध्ये आदरयुक्त भावना निर्माण करणारा क्षण आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर पदवीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग हा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उपयोग करायचा असतो. पदवीनंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. पदवी शिक्षणाचा कालावधी हा व्यक्तीला खूप काही शिकवून जातो. विद्यार्थिनीनी जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. विद्यार्थिनीनी महाविद्यालयाने केलेले संस्कार स्मरणात ठेवून भविष्यात महाविद्यालयाशी संपर्कात राहावे. त्यानंतर त्यांनी पदवी प्राप्त विद्यार्थीनीची स्तुती करून त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
या कार्याकर्माचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालायाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अशोक माळी यांनी केले. विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पदवीदान समारंभ संपन्न झाला. या पदवीदान समारंभासाठी सुमारे १०० विध्यार्थिनी उपस्थित होत्या. पदवीदान कार्यक्रमाचे वाचन परीक्षा विभागातील सदस्य डॉ विकास साळुंखे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा. सौ शीला मोहिते यांनी केले तर सूत्रसंचालन कु. क्षितिजा पवार आणि कु. वैष्णवी इनामदार आणि यांनी केले.