*राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिलासा* राज्यातील पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, यांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेचं ३१ मार्च पर्यंत नूतनीकरण आवश्यक असते. तथापि राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष हे नूतनीकरण शक्य होत नसल्याने यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत त्या वैध समजण्यात येतील,असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने कळविले होते. पण आता ही मुदत आता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे ,असे महासंचालनालयाने दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यात सध्या जवळपास ३ हजारहून अधिक अधिस्वीकृती धारक आहेत.