हमीभाव जाहीर : कपाशी- २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्राचे महत्त्व पूर्ण पाऊल – डॉ अनिल बोंडे यांच्याकडून केंद्राचे आभार

0
1059
Google search engine
Google search engine

 

(मुंबई ) – देशातील १४ खरीप पिकांचे किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास केंद्राने मंजूरी दिल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील तसेच राज्यातील दुष्काळी तालुक्यातील आणि जिरायती शेती करणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्याना फायदा होणार असल्यामुळे माजी कृषी मंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोन्डे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने खरीप २०२०-२१ करिताचे हमीभाव आज जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातास ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदास ३०० रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्यामुळे माजी कृषिमंत्री आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोन्डे यांनी सांगितले.

यामुळे डॉ बोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणखी एक शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारचे तसेच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (ता.१) हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’

एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात)

(कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)

भात/धान : १८६८ ( ५३)

भात/धान (ए ग्रेड) : १८८८ ( ५३)

ज्वारी : २६२० ( ७०)

ज्वारी मालदांडी : २६४० ( ७०)

बाजरी : २१५० ( १५०)

नाचणी : ३२९५ ( १४५)

मका : १८५० ( ९०)

तूर : ६००० ( २००)

मूग : ७१९६ ( १४६)

उडीद : ६००० ( ३००)

भूईमुग : ५२७५ ( १८५)

सूर्यफूल : ५८८५ ( २३५)

सोयाबीन : ३८८० ( १७०)

तीळ : ६८५५ ( ३७०)

खुरासणी : ६६९५ ( ७५५)

कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ ( २६०)कपाशी लांब धागा : ५८२५ ( २७५)