राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्याच पाप केंद्र सरकार करतय – सुप्रिया सुळे !

0
340
Google search engine
Google search engine

राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्याच पाप केंद्र सरकार करतय – सुप्रिया सुळे !


मुंबई – मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून कांजूरमार्गची जागा एमएमआरडीयला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही असं म्हटलं आहे.

यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळलीय. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय.
त्यांच्या कृतीतून ते दिसतंय, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय
.या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे..