मुंबई – ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून मुख्य सचिवांना पत्र देण्यात आलंय, ती जागा मिठागराची आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असं केंद्र सरकारचे म्हणणं आहे. केंद्र सरकारने 2002 साली मिठागराची अनेक जागा राज्य सरकारला हस्तांतरीत केल्या होत्या. आधी भाजपचे नेते म्हणत होते ही जागा राज्य सरकारची नाही तर खाजगी जमीन आहे, आता केंद्र सरकार म्हणतेय ही जागा आमची आहे. त्यामुळे भाजपला मेट्रोमध्ये अडथळा करायचा आहे का?, मेट्रोचे काम कसे थांबवायचे यासाठी भाजपकडून कटकारस्थान चालू आहे. तसेच याबाबत सर्व तपास करुन राज्य सरकार केंद्र सरकारला उत्तर देईल असंही मलिक यांनी म्हटलं आहे.