*प्रहार सेवकांनी धाटला एका गरजु चा संसार.*

0
594
Google search engine
Google search engine

 

रिद्धपूर:- आज तरुण हा व्यसनी, रागीट व आपल्याच धुंदीत जगणारी अनेक उदाहरणे आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात पण याच गोष्टी ला तडा देत रिद्धपूर येथील प्रहार संघटनेच्या युवकांनी नविन उदाहरण निर्माण केले आहे.
एका अनाथ मित्राला ज्याला राहायला घर नाही ना कुठले आर्थिक पाठबळ असता त्याच्या लग्नापासून ते संपुर्ण संसार धाटेपर्यतचा खर्च या युवकांनी उचलला. रिद्धपूर येथीलच मोहित हरीभाऊ अढाऊ गौरव गजाननराव जामठे, जितु रंगारी, तसेच शुभम बाहेकर अशी या तरुणांची नावे आहेत. आपल्या दिवाळी चा नविन कपडे फटाके तसेच अन्य खर्च न करता त्या पैशातून या युवकांनी या नवदाम्पत्यांना नविन कपडे, किराणा, घरावरील शेड तसेच धान्य देऊन त्याची दिवाळी गोड केली.
यावेळी प्रहार चे युवक मा जिल्हाध्यक्ष मोहित अढाऊ यांनी माहीती देत सांगितले की आपण कळत नकळत दिवाळी ला अनेक अशे खर्च करतो ज्यातुन आपण कुणा एका गरीबांची दिवाळी गोड करु शकतो. त्यामुळे सर्वांनी किमान एका घराची जबाबदारी घ्यावी. तसेच प्रहार सेवक गौरव जामठे यांनी सांगितले की प्रत्येक वेळी दिवाळी अशे कितीतरी वस्तू राहतात ज्या आपण फक्त वापरल्या म्हणून फेकुन देतो कुठेतरी त्या वस्तू अजुनही वापरण्या योग्य असतात त्या जरी आपण आपल्या सभोवतालच्या गरजु लोकांना दिल्या तरी त्यांना बराच आधार होऊ शकतो.