आमदार  देवेंद्र भुयार  यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले ! 

0
2522

आमदार  देवेंद्र भुयार  यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले !
वरुड मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी दिल्लीला पोहचले !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
         केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या कृषी कायद्याविरोधात वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दिल्लीला शेतकरी आंदोलनात दाखल झाले असून सर्वांनी  एकजुटीने दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो असल्याचे मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार  देवेंद्र भुयार यांनी सांगितले. बुधवारी वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी तामिळनाडू एक्सप्रेसने शेतकऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते दिल्लीकरिता रवाना झाले.
8 डिसेंबरला भारत बंद आंदोलनामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करून  मोर्चा काढून दिल्ली येथे तळ ठोकून असलेल्या शेतकर्‍यांच्या समर्थनात एल्गार पुकारला होता. आमदार देवेंद्र भुयार आपल्या  हजारो कार्यकर्त्यांसह दिल्ली करिता रवाना झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या बारा दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला कुठल्याही शेतकर्‍यांचे समर्थन नसल्याने आज संपूर्ण भारतभर विविध पक्ष व संघटनेन आंदोलन पुकारले, आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्र सरकारला आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता, अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकर्‍यांसोबत आंदोलन करू असा ईशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्र शासनाला दिला होता.
       शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह हजारो कार्यकर्ते वरुड मोर्शी तालुक्यातून दिल्ली येथे दाखल झाले असून यावेळी वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी शेतकऱ्यांवर लादलेल्या कायद्या विरोधात शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला आंदोलनात सहभागी झाले आहे.
दिल्ली येथे सुरू असलेल्या येथे सुरू असलेल्या  देशव्यापी आंदोलनासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत विविध भागांतून शेतकरी बांधव आले होते. त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. ‘या सरकारचे करायचे तरी काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा रेल्वेस्थानकावर शेतकऱ्यांनी दिल्या.
मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : आमदार देवेंद्र भुयार
  लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले; पण गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. यावेळी यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, इतिहासात देशपातळीवर पहिल्यांदाच शेतकरी या आंदोलनानिमित्त एकत्र आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले; पण त्यांनी ते पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा,उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा, संपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा व्हावा आणि उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळाला, या मागणीसाठी शेतकरी एकत्र आला आहे.
लोकवर्गणीतून हजारो शेतकरी दिल्लीला येत आहे. हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली येथे दाखल झाले असून, केंद्र सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.