अमरावती :-
तापडिया मॉल येथे असलेल्या मिराज सिनेमांमध्ये फूड स्टॉल वर विविध पदार्थांवर अति जास्त रक्कम आकारली जात असून नागरिकांची लूट सुरू आहे. ज्या गोष्टींची एमआरपी बाजार भाव ठरलेला असून त्या गोष्टींवर ८० ९० टक्के ने वाढ करून त्या सर्व गोष्टी नागरिकांना विकत आहेत (पाण्याची बॉटल ८० रुपये, कोल्ड्रिंक २१० रुपये, समोसा १०० रुपये) यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे याकडे आपण तातडीने लक्ष घालून त्या पदार्थांची रक्कम ठरवल्याप्रमाणे विकावे असे आपल्या मार्फत त्यांना समजून सांगावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांना येत्या सात दिवसात समजावून सांगेल अशा संदर्भातीतल निवेदन आज देण्यात आले
स्थानिक तापडिया मॉल येथे असलेल्या मीराज सिनेमांमध्ये खाण्याच्या पदार्थावर नागरिकांकडून लूट सुरू आहे असे निवेदन शहराध्यक्ष धिरज तायडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले
यावेळी शहराध्यक्ष धिरज तायडे,शहर सचिव रोशन शिंदे,शहर उपाध्यक्ष प्रवीण घोरपडे, पवन लेंडे, शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, मयंक तांबूसकर,देवा धुमाळे,अमन मडावी, सौरभ किटूकले, आसिफ सय्यद आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.