बॅरिकेट्स तोडून कॉंग्रेस च्या मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यालयात

0
684
Google search engine
Google search engine

काँग्रेस मोर्चा अमरावती

Gepostet von Vidarbha24News am Samstag, 29. Juli 2017

 

 

कर्जमाफीमध्ये ३0 जून २0१७ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश करा, सर्व शेतीपुरक शेती अवजारे पॉली हाऊस, शेडनेट, मत्स्यपालन, शेळी – मेंढी पालन, कुक्कुटपालन इ. साठी घेतलेली सर्व कर्ज माफ करा, नागरी बँका पतसंस्था व मायक्रोफायनान्स यांचेकडून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या माफीसाठी त्याच प्रमाणे शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली असता त्यांना तातडीने नुकसान भरपायी देण्यात यावी. जिल्ह्यातील बंद पडलेली तूर खरेदी त्वरित सुरू करून तुरीचे पैसे त्वरि द्या, शहरी भागात व्यापारी वर्गासाठी शासनाने जाहीर केलेल्या जीएसटी मधील जाचक अटी रद्द करा इ. मागण्यांचे संदर्भात आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलु देशमुख यांचे नेतृत्वात भव्यदिव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यता आले होते. मोर्चात प्रामुख्याने आ. यशोमती ठाकुर, आ. विरेंद्र जगताप सह हजारो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पोलिसांकडून मोर्च्या अडवण्यात आला होता परंतु कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून दोन्ही गेट ढकलत आतमध्ये प्रवेश केला . निवेदन नंतर यशोमतीती ठाकूर , श्री वीरेंद्र जगताप , बबलू भाऊ देशमुख यांना जिल्हाधिकारी चौकात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संपूर्ण एकेरी रस्ता बंद ठेवण्यात आला होता