कत्तलीसाठी नेत असलेल्या १३ गायी आणि वासरे यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सुटका, ९ धर्मांधांना अटक

0
1240
Google search engine
Google search engine

गोरक्षक अशोक चौधरी यांना धर्मांधांकडून जीवघेणी मारहाण

जे गोरक्षकाच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणाऱ्यां पोलिसांच्या निदर्शनास कसे येत नाही ?

 

मुंबई- वसई (पश्चिम) येथे ३ ऑगस्ट या दिवशी पशूवधगृहात कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गाडीतून ९ गायी आणि ४ वासरे यांची हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांच्या साहाय्याने सुटका केली. या वेळी गोरक्षक श्री. अशोक चौधरी यांना जीवघेणी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नाझीर हजीम शेख, शरीफ युसूफ काझी यांच्यासह अन्य ७ धर्मांधांना अटक करण्यात आली. गाडीमध्ये गोमाता आणि वासरे यांना अक्षरश: कोंबण्यात आले होते. ही गाडी नालासोपारा येथील वाजा मोहल्ला येथे जात होती. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम अन्वये प्रथमदर्शनी अहवाल (एफ्आयआर्) नोंदवण्यात आला.