नवी देहली –
शाहजहान याने जयपूरच्या राजावर दबाव निर्माण करून ताजमहालसाठी भूमी घेतली होती. या बदल्यात त्याला ४० गावे देण्यात आली होती. त्यामुळे ही चोरीचीच भूमी आहे. याचे माझ्याकडे पुरावे असून मी लवकरच ते उघड करीन, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ‘ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील डाग आहे’, असे म्हटले होते. त्यावर डॉ. स्वामी बोलत होते.